मोहाली – येथील मैदानावर शनिवारी झालेल्या पंजाबविरूद्धच्या सामन्यात आरसीबीने विजयाचे खाते उघडले असले तरी या सामन्यानंतर विराट कोहलीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सामनाधिकाऱ्यांनी आरसीबी संघाने पंजाबविरोधात निर्धारित वेळेत षटके पुर्ण न केल्याने विराट कोहलीला दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी विराटला 12 लाखचा दंड बसला आहे. यापूर्वी निर्धारित वेळेत षटके पुर्ण न केल्याच्या प्रकरणात हिटमॅन रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनादेखील अशी शिक्षा देण्यात आली होती.
या वेळी सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेणाऱ्या विराटच्या संघाने सातव्या सामन्यात विजयी कामगिरी केली. पंजाबने प्रथम फलंदाजी करत बंगळुरूसमोर 173 धावांचे आव्हान ठेवले. 173 धावांचे आव्हान स्विकारून विराटने 53 चेंडूत 63 धावा केल्या तर ए बी डिव्हीलीयर्स अर्धशतकी खेळत 8 गडी राखून पंजाबवर विजय मिळवला.