https://www.facebook.com/edainikprabhat/videos/450904349059889/
सातारा (प्रतिनिधी) – गेली दोन दिवस निरा देवधरच्या पाणीप्रश्नावरून सातारा जिल्ह्याचे राजकारण चांगलेच पेटले. खा. उदयनराजेंनी दोन दिवसापुर्वी अप्रत्यक्ष रामराजेंच्यावर टिका केली होती. त्यानंतर रामराजेंनी चक्रम म्हणत प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर उदयनराजे समर्थकांनी पोवई नाक्यावर रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपला संताप व्यक्त केला.
राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या कृत्यामुळे काही गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस दलाची चांगलीच पळापळ झाली. त्यानंतर शहरात कायदा सुव्यवस्थेचा कोणाताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीसांनी सातारा शहरातून सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गाड्यांचा ताफा फिरवत शहरातील कायदा सुव्यस्थेची पाहणी करून कोणत्याही परिस्थिती सामोरे जाण्यास पोलीस सज्ज असल्याचा विश्वास लोकांना दिला