अमेठी – लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात सात राज्यांमध्ये ५१ जागासाठी मतदान सुरु आहे. उत्तरप्रदेशमधील अमेठीतील मतदान केंद्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून बळकावण्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. स्मृती इराणी यांनी एका वृद्धेचा व्हिडीओ ट्विटवरवर शेअर करत हा आरोप केला आहे.
या व्हिडीओमध्ये वृद्ध महिला म्हणत आहे कि, मला कमळाला मत द्यायचे होते. परंतु, मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी माझा हात पकडून जबरदस्तीने पंजाचे चिन्हासमोरील बटन दाबले, असे त्या सांगत आहेत. दरम्यान, या व्हिडिओला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा नाही.
याप्रकरणी एसडीएम यांनी म्हंटले कि, अद्यापपर्यंत मला कोणतीही तक्रार मिळाली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली असून त्याची सत्यता पडताळली जात आहे.
दरम्यान, स्मृती इराणी यांनी हा व्हिडीओ ट्विट करत राहुल गांधींवर बूथ कॅप्चरिंगचा आरोप लावला आहे.
Alert @ECISVEEP Congress President @RahulGandhi ensuring booth capturing. https://t.co/KbAgGOrRhI
— Smriti Z Irani (Modi Ka Parivar) (@smritiirani) May 6, 2019