सातारा – वृक्षांच्या घटत्या संख्येचा परिणाम पर्यावरण आणि पर्जन्यमानावर होत असल्याचे प्रबोधन करण्यासाठी आता विवाह सोहळ्यामध्ये आप्तेष्टांचे स्वागत वृक्ष देऊन होत आहे. म्हसवड (ता. माण) येथे झालेल्या खांडेकर- पाटसकर विवाहादरम्यान आप्तेष्टांना वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, युवराज सुर्यवंशी, श्रीराम पाटील, डॉ. संदीप पोळ यांनी खांडेकर- पाटसकर यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.