पुणे – लोकसभा सार्वत्रिक निकालानंतर महापालिकेत बदल्यांचे वारे वाहणार आहे. ज्या अधिकाऱ्यांना त्यांच्या आता असलेल्या पदावर तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांच्या बदल्या आणि अन्य बदल्याही करण्यात येणार आहेत.
सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचासंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान या बदल्या केल्या जाणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
महापालिकेंतर्गत ज्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, तसेच आणखी अन्य विशेष प्रकल्पांसाठी वगैरे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे दि.23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लगेचच या बदल्या केल्या जाणार आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेच्या काळात बदल्यांचा निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, आयएएसपासून ते बहुतांश पदांच्या बदल्याही 23 तारखेनंतर होणार आहेत.