मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे. यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचे भारतीय हवामान खात्यानं स्पष्ट केले आहे. राज्यात सर्वत्र सूर्य आग ओकत असताना हि बातमी सर्वांसाठी दिलासादायक आहे.
मान्सूनचे अंदमान निकोबार बेटांवर आगमन झालं असून पण पुढची वाटचाल संथ गतीने होत आहे. साधारण 6 जूनला मान्सून केरळात येईल, असा ताजा अंदाज आहे. राज्यात दाखल होण्यासाठी किमान 15 ते 17 जून उजाडेल असा अंदाज आहे. दरवर्षी ७ जूनला दाखल यंदा उशीरा येणार आहे.
India Meteorological Department: Rainfall over the country as a whole for the 2019 southwest monsoon season (June to September) is most likely to be normal. pic.twitter.com/dR50XBFVDE
— ANI (@ANI) May 31, 2019
दक्षिण भारतात सरासरीच्या 97 टक्के तर ईशान्य भारतात 91 टक्के पावसाचा अंदाज आहे. तसेच उत्तर आणि पश्चिम भारतात 94 टक्के पाऊस होईल असा अंदाज रतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्य भारतात यंदा मोसमी पाऊस सर्वाधिक बरसणार असून तिथे 100 टक्के पावसाचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबरमध्ये सरासरी 96 टक्के पाऊस होईल. जुलैमध्ये पावसाचं प्रमाण साधारण किंवा कमी असेल. ऑगस्टमध्ये मात्र चांगला पाऊस होईल.
यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असला तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये. त्यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करावी आणि हवामानाच्या सल्ल्यानुसार पुढचे नियोजन करावे, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.