मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे कार्यकर्ते खचून गेले आहेत, पण कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. आज सत्तेत असलेला पक्ष ४० वर्षे विरोधात होता, आपण तर १५ वर्षे सत्तेत होतो. त्यामुळे खचून जाऊ नका. जोमाने कामाला लागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नंबर एकचा पक्ष बनवा, असे आवाहन विधिमंडळाचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 20 वा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईत पार पडला, दरम्यान मुंडे बोलत होते.
अनेकांना लोकसभेतील निकालावर शंका आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील धानोरा गावात भाजपाला कधी ३०० मते मिळाली नव्हती तिथे यावेळी १२०० मते मिळाली. तिथल्या लोकांनादेखील यावर विश्वास नाही. लोक म्हणतात की हा भाजपचा विजय नसून भाजपने मॅनेज केलेल्या ईव्हीएमचा विजय आहे
झालं ते झालं.. सर्व गोष्टी बाजूला सारा, तुमच्याकडे ९० दिवस आहेत. झपाटून काम करा, तुम्हाला कोणतेही मशीन आडवणार नाही. आदरणीय शरद पवार साहेबांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती करूया, वर्धापन दिनी शपथ घ्या आणि लोकसभा निवडणुकांचे उट्टे विधानसभेत काढा, असे धनंजय मुंडे म्हणाले.