कोल्हापूर – रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालूक्यात असलेले तिवरे धरण फुटल्याने भेंडवाडी गावातील 13 घरे वाहून गेली आहेत. गावातील 25 जण बेपत्ता असून त्यापैकी 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर काही जणांच्या मृतदेहाचा अजून शोध सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे.
या परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी कोल्हापूरहून व्हाईट आर्मीच्या पंधरा जणांची रेस्क्यू टीम चिपळूणला रवाना झाली आहे. उज्वल नागेशकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व आपत्कालीन साहित्यासह ही टीम आज रवाना झाली आहे