नवी दिल्ली – उन्हाळ्यामुळे सगळीकडे चांगलेच तापत असताना यंदा सरासरीच्या जवळपास पर्जन्यमान राहणार असण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणि शेतकरी बांधवाना यामुळे दिलासा मिळणार आहे.
अल निनोचा प्रभाव असला तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात यंदा चांगला पाऊस पडेल असे भाकीत भारतीय हवामान खात्याने आज वर्तविले. मागील काही दिवसांपूर्वी काही खासगी संस्थांनी अल निनोचा प्रभाव असल्याने यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे सांगितले होते. मात्र भारतीय हवामान खात्याने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अल निनोचा प्रभाव कमी होऊन पर्जन्यमान चांगले होईल असे म्हंटले आहे. त्यामुळे खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
IMD: Overall the country is expected to have well distributed rainfall in 2019 monsoon season. It will be beneficial for the farmers in the ensuing Kharif season. https://t.co/sbATHR4lOU
— ANI (@ANI) April 15, 2019