पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 82.82 टक्के लागला आहे.
यंदा राज्याचा निकाल ७७.१० टक्के लागला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल १२.२१ टक्क्याने घटला. तर मुलांचा निकाल 72.18 % लागला. पुणे विभाग ८२. ४८ टक्के, नागपूर विभाग ६७.२७ टक्के, औरंगाबाद विभाग ७५.२० टक्के, मुंबई विभाग ७७.०४ टक्के, कोल्हापूर विभाग ८६.५८ टक्के, अमरावती विभाग ७१.९८ टक्के, नाशिक विभाग ७७.५८ टक्के, लातूर विभाग ७२.८७ टक्के, कोकण विभाग ८८.३८ टक्के लागला आहे.
या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यावरून निकालाची प्रिंट आऊट घेता येईल. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुडपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. यासाठी त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी 10 ते 19 जून, तर छायाप्रतीसाठी दि. 10 ते 29 जूनपर्यंत शुल्क भरून अर्ज करण्याची मुदत आहे, असे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे :
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
“एसएमएस’ सेवेद्वारे निकाल पाहण्यासाठी :
bsnl मोबाइलमधून MHSSC 57766 या क्रमांकावर पाठवा.