मुंबई – व्याजदर बदलाबाबत निर्णय घेण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेची पतधोरण बैठक सुरू झाली आहे. बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेली ही बैठक चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या द्विमासिक कालावधीसाठीची आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे यंदा किमान पाव टक्का रेपो दर कपातीची अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त होत असताना बॅंकेचा याबाबतचा अंतिम निर्णय प्रत्यक्षात गुरुवारी जाहीर केला जाणार आहे.
यापूर्वीच्या सलग दोन पतधोरणांमध्ये प्रत्येकी पाव टक्का रेपो दरकपात झाली आहे. गव्हर्नर दास यांनी गेल्याच आठवड्यात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर पतधोरण बैठकपूर्व चर्चा केली होती. केंद्रीय अर्थखात्याचा कार्यभार आता पियुष गोयल यांच्याकडे आला आहे. सरकारचा परिपूर्ण अर्थसंकल्प 5 जुलै रोजी जाहीर होणार आहे.