सध्याचा वादग्रस्त मुद्दा म्हणजे अयोध्येतील राममंदिर. राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र विधेयक मांडावे किंवा अध्यादेश काढावा, अशी मागणी राजकीय संघटना आणि धार्मिक संघटनांकडून करण्यात येते आहे. सरकारकडून मात्र अद्याप सर्वोच्च न्यायालयातील निकालाची वाट पाहण्याचे धोरण अनुसरले आहे. मात्र आगामी वर्षातील निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर हा मुद्दा अधिकच पेटणार अशी चिन्हे दिसायला लागली आहेत. या मुद्द्यावर आधारित राम जन्मभूमी या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अशा धार्मिक वादावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी सेन्सॉर बोर्डाने दिली कशी? असा सवाल या याचिकेतून करण्यात आला आहे.
या सिनेमामध्ये बाबरी मशिदीवर भगवा ध्वज फडकत असल्याचे दर्शवले गेले आहे. त्यावर “जय श्रीराम’ असे लिहीलेले असल्याने बाबरी मशिद पाडली गेल्यानंतर देशात घडलेल्या घटनांचे दर्शन या सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे देशातील धार्मिक विद्वेषाचे वातावरण अधिक चिघळवण्याचा प्रयत्न या सिनेमातून केला जात असल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांकडून केला गेला आहे. राजकीय ध्रुवीकरण टाळण्यासाठी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे. येत्या 4 डिसेंबरला या प्रकरणात प्राथमिक सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाने निश्चित केली आहे.
फोटो आहे
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा