शिर्डी – भाजप आणि शिवसेनेची युती ही मागच्या युतीपेक्षा यावेळेस अधिक घट्ट असल्याचा दावा युवा सेनेचे अध्यक्ष ‘आदित्य ठाकरे’ यांनी कोपरगाव येथील जाहीर सभेत केला आहे. भाजप सेनेची युती गेल्या तीस वर्षांपासून आहे. असं देखील आदित्य यांनी म्हंटल आहे. तसेच यावेळी आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसवर सुद्धा जोरदार टीका केली आहे.
शिर्डी लोकसभेचे युतीचे उमेदवार ‘सदाशील लोखंडे’ यांच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे बोलत होते. आता, संपूर्ण महाराष्ट्रात फक्त भगवी लाट आहे. स्वतःची कामे न करता आधी लोकांची कामे खासदारांनी केली आहे. भ्रष्टवादी काँग्रेसची भ्रष्ट कामे सुधरवण्याचे काम आम्हाला करावे लागत आहे. अशी टीका आदित्य ठाकरेंनी काँग्रेसवर केली.
यावेळी आदित्य ठाकरे कोपरगाव येथील पाणी प्रश्नावर सुद्धा बोलले. कोपरगावातील पाणी प्रश्न बिकट असून, पाण्यासाठी कुठे जाण्याची वेळ आली तर मी स्वतः येईल असे अश्वासन आदित्य ठाकरेंनी स्थनिकांना दिले. मतदान हे तुमचे हक्काचे आणि सर्वात मोठे शस्त्र असून, ते तुम्ही बजवा त्यामुळे या देशात चांगले उमेदवार निवडून येतील. असे सांगत आदित्य ठाकरेंनी मतदान करण्याचे आव्हान केले आहे.