पावसाच्या दाट रेघा
थांबल्या, ओथंबल्या
हाक एक… तान एक
अंगणी त्या धावल्या…
मैत्र माझे बघ पुराणे
कोकीळेचा रव म्हणे
सागराच्या हस्त डोही
मौक्तिकाचा शिंपला…
धाव घेती, नाव घेती
रानचाहूल लाजते
गर्भ ओला, कोंब ल्याला
भार साही सोहळा…
मृत्तिकेशी गूज वारा
चंदनी वेडावला
रात सारी चिंब झाली
शेवटच्या वेदना…
ऊन न्हाले, तृप्त झाले
मार्दवी मग सावल्या
घे उराशी बांध मोठा
भावबंधी शृंखला…
– डॉ. ऊर्जिता कुलकर्णी