औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. एमआयएमच्या नगरसेवकांनी औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील (एमआयएम) यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर काही नगरसेवकांनी इतर खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्याबाबत मुद्दा मांडला.
त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांनी महापालिकेत राडा केला. या गोंधळादरम्यान एमआयएमच्या एका नगरसेवकाने राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा वादही झाला.
परिणामी गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. महापौर नदंकुमार घोडे यांनी एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे एका दिवसासाठी सदस्यत्व रद्द केले आहे.