सत्ताधाऱ्यांवर अजित पवार संतापले
मुंबई – काल (सोमवार) सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे. यामुळे महानगरीतील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 2, 4 आणि 5 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मात्र, जोरदार पावसामुळे मुंबईत जागोजागी पाणी तुंबले आहे. त्यामळे नागरिकांनी मुंबई महापालिकेला दोष द्यायला सुरुवात केली आहे. तसेच, विरोधक देखील आक्रमक झाले असून सत्ताधारी पक्षावर टीका करत आहे.
दरवर्षी @mybmc मुंबई स्वच्छ झाल्याचा दावा करते.सरकारनं खबरदारी न घेतल्यानं किड्या-मुंग्यांप्रमाणे माणसं मरतात. जे आहे ते सांभाळता येत नसलेले Smart City करायला निघालेत! महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही. हा सत्तेचा माज आहे. सरकारचा बेजबाबदारपणा आहे. #MonsoonSession #MumbaiRain
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 2, 2019
मुंबईच्या या परिस्थितीवर राष्ट्रवादीचे नेते ‘अजित पवार’ यांनी सुद्धा ट्विटर अकाऊंटवरून टीका केली आहे. “जे आहे ते सांभाळता येत नसलेले स्मार्ट सिटी करायला निघालेत! महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही. हा सत्तेचा माज आहे”. असं अजित पवार म्हणाले आहे.