पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीला आज भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर दिले असून या हमल्यात पाकिस्तानला आपले ३ सैनिक गमवावे लागले असल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन नागरीवस्त्यांना लक्ष्य करण्यात येत होते. त्यामुळे भारतीय लष्कराने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे.
भारतीय सैन्याने मोठी कारवाई करत नियंत्रण रेषेपलीकडील पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून पूँछ, राजौरी येथील नागरीवस्त्यांवर गोळीबार आणि तोफांचा मारा सुरु होता. या गोळीबारात काल एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर अनेक नागरीक जखमी झाले होते. त्यामुळे भारतीय सेना दलाने आज कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचीही जिवीतहानी झाली आहे. पाकिस्तानने आपले तीन सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. पण प्रत्यक्षात हा आकडा त्यापेक्षा जास्त असल्याचे भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Pakistan Army says 3 soldiers dead in Indian firing, Indian Army sources say toll higher
Read @ANI story | https://t.co/69fsHcVX80 pic.twitter.com/oOnjEz4zMU
— ANI Digital (@ani_digital) April 2, 2019
पाकिस्तानने काल केलेल्या तोफ गोळयांच्या माऱ्यात तिघांचा मृत्यू झाला होता तर २४ जण जखमी झाले होते. त्यामुळे भारतीय सैन्याकडून आज अशा प्रकारची जोरदार कारवाई करण्यात आली आहे.