श्रीकांत चिंतल : राष्ट्र सेवा दल 79 वा स्थापना दिन साजरा
नगर – लोकशाहीच्या देशात आत्मकेंद्रित व संकुचित विचारांकडे चाललेली संस्कृती सामाजिक विषमता वाढविणारे आहे. खरा तो एकची धर्म चा सेवा दल साने गुरुजींचा विचार सुदृढ समाज निर्मितीस प्रेरक ठरेल, असा विचार सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत चिंताल यांनी व्यक्त केला.
राष्ट्र सेवा दलाच्या 79 व्या स्थापना दिनानिमित्त नगर शहर जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शैला गांधी, बाजीराव जाधव, सुभाष पाठक, विनायक सापा, श्रीनिवास एल्लाराम, सोन्याबापू कुसळे, स्मिता म्याना, शोभना गिते. लीना नेटके, गिता एल्लाराम, स्वप्निल चिंतल, रसिका म्याना, सुदर्शनी गांधी, राज एल्लराम, सुरभी गांधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुप्रिया मैड, बापू जोशी, अनघा ससाणे, शिवाजी नाईकवाडी, गोविंद आडम यांचे सहकार्य केले.