11 टक्के पाऊस कमी झाल्याने 8 टक्के साठा कमी
पावसाची प्रतीक्षा : केवळ 17.35 टक्के पाणीसाठाआतापर्यंतचा सर्वात निचांकी पाणीसाठा
तेव्हा दर दोन दिवसांनी पाणी पुरवठा
दरम्यान, यंदा मॉन्सून सुमारे दहा दिवस लांबणीवर पडला आहे. तरीदेखील या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दोन दिवस मावळात हजेरी लावली आहे. मात्र, धरण क्षेत्रातील या पावसाचा फारसा काही उपयोग झालेला नाही. सध्या धरणातील पाणीसाठा 17.35 टक्क्यांवर पोचला आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्या कार्यकाळात हाच पाणीसाठा 18 टक्क्यांवर पोहचल्याने शहराची पाणीकपात आणखी तीव्र करत, दोन दिवसांनी पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, आठवडाभरातच पावसाने राज्यात दमदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. ही पाणीकपात रद्द करुन, शहराला दररोज पाणीपुरवठा सुरु करण्यात आला होता. आता पवना धरणाचा पाणीसाठा 18 टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. मात्र, हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरू शकणार आहे. त्यामुळे पाणीकपात आणखी तीव्र करण्याबाबत अद्यापही महापालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
पिंपरी – पवना धरणातील पाणीसाठा पहिल्यांदाच एवढा खोलवर गेला आहे. धरणात आतापर्यंतच निचांकी पाणीसाठा उरला आहे. पावसाला विलंब झाल्याने, या साठ्यातच शहर व परिसरातील गावे व एमआयडीसीला पाणीपुरठा करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाला करावे लागणार आहे. पाणी जुलै अखेरपर्यंत पुरेल त्यामुळे आणखी पाणी कपातीची गरज भासणार नाही, असे प्रशासनाने सांगितले असले तरी धरणातील पाणी साठ्याची स्थिती नक्कीच चिंताजनक आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून शहराबरोबरच मावळातील ग्रामपंचायती व एमआयडीसींना पाणी पुरवठा केला जातो. दरवर्षी 15 ऑक्टोबरला पाण्याचे नियोजन करण्यात येते. मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून पाऊस न आल्याने वर्षभराच्या पाण्याचे नियोजन लवकर करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 11 टक्के पाऊस कमी झाला असून, 200 मिलीमीटर पाऊस कमी झाल्याने पवना धरणात 8 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील वर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा होता; पण यावर्षी 20 ऑक्टोबरला धरणात 92 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. धरणात पाणीसाठा कमी असताना देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नियमितपणे 460 ते 480 एमएलडी प्रतिदिन एवढा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तरीदेखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पवना धरणातून पाणीपुरवठा कमी केल्याने शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे वक्तव्य केल्याने जलसंपदा विभागाने महानगरपालिकेला लेखी पत्र पाठवत, परिस्थितीची जाणीव करून दिली होती.
यापूर्वी शहरात दोन वेळा पाणीकपात करण्यात आली आहे. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा जुलैअखेरपर्यंत पुरू शकणार आहे. याशिवाय मॉन्सूनचेही आगमन होणार असल्याने पाणीकपात आणखी तीव्र करण्याची सध्यातरी गरज नाही.
– राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका