औरंगाबाद: मराठवाड्यातील दुष्काळ पुढची पिढी पाहणार नाही.मराठवाड्यातील प्रमुख धरणे एकमेकांना जोडणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज औरंगाबादच्या लासूर स्टेशन गावच्या चारा छावणीला भेट दिली मुख्यमंत्र्यानी भेट दिली यावेळी ते बोलत होते.
दुष्काळ दूर करण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. मराठवाड्यातील दुष्काळ पुढची पिढी पाहणार नाही. तसेच मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ असेल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला दिला. त्यासाठी उपाययोजनाही सुरु केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ११ प्रमुख धरणांची एक ग्रीड आम्ही तयार करतोय त्यांना पाईपने जोडण्याची योजना आहे. पाईपच्या माध्यमातूनच पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी पोहोचवायचे आहे. याचे दोन महिन्यांत टेंडरही काढण्यात येईल. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणता येईल, तसे झाले तर १०० टीएमसी पाणी आपण आणू शकतो त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल,असे मुख्यमंत्री म्हणाले.