मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना यांचा मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपट ५ जूनला ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अटकडला होता. ‘भारत’ हे चित्रपटाचे शीर्षक लोकांच्या भावना दुखावणारे असल्यामुळे चित्रपटाच्या नावावरून दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, आता दिल्ली हायकोर्टाने चित्रपटावरील याचिका रद्द केली आहे.
याचिकेअंतर्गत चित्रपटाचे नाव हे कलम-३ (अनुचित वापर प्रतिबंधक) कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे ‘भारत’ हा शब्द व्यवसायिक हेतूसाठी वापरला जाऊ शकत नाही. असा दावा याचिकाकर्त्याने केला होता. ‘भारत’ चित्रपट हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.
Delhi High Court dismisses the PIL seeking stay on the release of upcoming movie 'Bharat.' Petition stated that title of film is in violation of Section-3 Emblems & names (Prevention of Improper Use) Act, according to which word 'Bharat' can't be used for commercial purpose. pic.twitter.com/sEB8bAGuAb
— ANI (@ANI) June 3, 2019