पण तरिही सतर्कतेचा इशारा कायम
अहमदाबाद/ नवी दिल्ली – अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या “वायु’चक्रिवादळाने आपली दिशा बदलली असल्याने आता ते पूर्वीच्या अंदाज वर्तवलल्याप्रामाणे गुजरातच्या किनाऱ्याला धडकणार नाही. मात्र तरिही गुजरात सरकारने या संदर्भातील इशारा कायम ठेवला आहे.
गुजरात सरकारने चक्रिवादळाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सखल भागातील सुमारे 3 लाख लोकांचे स्थलांतर केले आहे. राज्यातील विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत आणि तब्बल 70 रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ही खबरदारी शुक्रवरपर्यंत कायम राहणार आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
“वायु’चक्रिवादळाने अतिभयंकर चक्रिवादळाचे स्वरुप धारण केल्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली होती. हे वादळ आज दुपारी गुजरातच्या किनाऱ्यावर धडकनार होते. मात्र हवामान विभागच्या अहवालानुसार हे वादळ किनाऱ्याजवळच्या गीर सोमनाथ जिल्ह्यातल्या वेरावल पासून 150 किलोमीटर अंतरावर होते.
हे चक्रिवादळ जमिनीवर येण्याऐवजी सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरून उत्तर-ईशान्येकडे सरकणार आहे. दिशा किंचीत बदलली आहे. आता हे चक्रिवादळ जरी जमिनीवर येणार नसले तरी त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे पावसाची शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा अहमदाबादेतील हवामान केंद्राच्या अतिरिक्त संचालक मनोरमा मोहांती यांनी दिला आहे. अ