मुंबई- सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा राज्यापासून दिल्लीपर्यंत रंगल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होणारच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले होते.
मात्र, त्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (१५ जून) नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. यावेळी फडणवीस भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नितीन गडकरींची भेट घेणार आहेत. जर पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला तरच रविवारी (१६ जून) मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्त्या आहे.