नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द बातल ठरवला असून तो काढून टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे.हा खटला मागे घेण्यास संबंधीत महिलेचाही आक्षेप नाही असे कोर्टाने नमूद केले आहे. पती-पत्नीमधील वादाचा हा खटला आहे.
सोमनाथ भारती यांच्या विरोधात त्यांच्या पत्नींनी घरगुती हिंसाचार कायद्यान्वये हा गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यांना या प्रकरणात मिळालेला जामीनही रद्द करावा अशी मागणी करणारी याचिकाही त्यांनी सादर केली होती. तथापी या पती-पत्नींमध्ये नंतर तडजोड झाल्याने हा गुन्हा आणि खटला रद्द करण्यास कोर्टाने अनमुती दिली आहे. या आधी 9 सप्टेंबर 2015 मध्ये सोमनाथ भारती यांच्या पत्नी यांनी आपल्या पतीच्या विरोधात आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.