सोलापूर: आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यातील दहा मतदारसंघात सरासरी ४६.६३ टक्के मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या मतदारसंघाचा समावेश आहे.
दरम्यान, बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथे लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे यामुळे सकाळी दहावाजेपर्यंत येथील मतदान केंद्रावर एकही मतदान झाले नाही़.