मथुरापुर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील मथुरापुर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना, “पश्चिम बंगालमधील सरस्वती आणि दुर्गा पूजेचा प्रश्न, तसेच जय श्रीराम म्हंटल्यावर होणाऱ्या शिक्षेचा प्रश्न अशा प्रश्नांनी पश्चिम बंगालमधील जनता त्रासून गेली होती. भाजपने राष्ट्रीय पातळीवर हे प्रश्न मांडले असून आता भारतीय जनता पक्षच पश्चिम बंगालचा आवाज बनला आहे.” असा दावा केला.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “अमित शहा यांच्या रोड शो वेळी ईश्वर चंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची करण्यात आलेली मोडतोड ही तृणमूल काँग्रेसच्या ‘गुंडानीच’ केली असून ईश्वर चंद्र विद्यासागर यांचा पुतळा पाडणाऱ्या तृणमूलच्या गुंडांवर कडक कारवाई व्हायला हवी. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रणित पश्चिम बंगाल सरकार हा पुतळा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पाडला असल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेले पुरावे नष्ट करत आहे. .” असे आरोप लावले.
तत्पूर्वी, लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये १९ मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीचा प्रचार मुदतीपूर्वीच थांबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने काल घेतला असून आज रात्री १० वाजल्यापासून निवडणूक संपेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये कसल्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाहीये. दरम्यान भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मंगळवारच्या “रोड शो’ वेळी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने आर्टिकल ३२४चा वापर करत मतदारांच्या संरक्षणासाठी मुदतपूर्व प्रचारबंदीचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील डमडम. बारासात, बासिरहात, जयनगर, मथुरापूर, जदवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकात्ता या 9 लोकसभा मतदारसंघांमध्ये १९ मी रोजी निवडणूक होणार आहे.
PM Modi: There is a problem here regarding Durga puja & Saraswati puja, saying Jai Sri Ram has become a crime. People of Bengal were troubled by these things since a few years, who brought these issues on a national platform?Which party has become voice of Bengal today, it's BJP. https://t.co/UGNEFQUGhc
— ANI (@ANI) May 16, 2019