लंडन( साऊदॅम्प्टन) : भारतीय फिरकीपटू गोलंदाज युज़वेंद्र चहल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत 9 बाद 227 धावसंख्येवर रोखल्यामुळे सामना जिंकण्यासाठी भारतीय संघापुढे 50 षटकांत 228 धावांचे लक्ष्य आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने समोर ठेवलेल्या तुटपुंज्या धावसंख्येचा सामना करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने शानदार शतक झळकावले असून तो सध्या १०० धावांवर नाबाद आहे. रोहित शर्माच्या जोडीला चौथ्या विकेटसाठी मैदानावर उतरलेला महेंद्र सिंह धोनी असून त्याने नाबाद २६ धावांची खेळी केली आहे. भारताला विजयासाठी ४४ चेंडूंमध्ये ४० धावांची आवश्यकता आहे.
South Africa finish their innings on 227/9 – Chris Morris top scoring with 42.
Yuzvendra Chahal, on World Cup debut, took 4/51 for #TeamIndia!#SAvIND pic.twitter.com/aAq3gCIkjs
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 5, 2019
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली होती. मात्र भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारती आली नाही. आफ्रिकेचे सलामीवीर हाशिम आमला (6) आणि क्विंटन डी काँक (10) यांना जसप्रीत बुमराहाने माघारी धाडले. त्यानंतर फाफ डु प्लेसी (38), रैसी वैन डर डुसेन (22) आणि डेविड मिलर (31) यांना फिरकीपटू युजवेंद्र चहल याने बाद करत माघारी धाडले. त्यानंतर एन्डिले फेहलुकवेओने 34 आणि क्रिस माॅरिसने 42 धावा करत आफ्रिकेचा डाव सावरला, तर कगिसो रबाडा याने नाबाद 31 धावा करत द. आफ्रिकेची धावसंख्या 227 पर्यंत नेली.
भारतीय गोलंदाजीत फिरकीपटू युजवेंद्र चहलने 10 षटकांत 51 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 गडी तर कुलदीप यादव याने 1 गडी बाद केला.