हिंगोली: पावसाळ्याचे दिवस सूर झाले आणि शेतकऱ्याने आपल्या शेतीची मशागत करणे सुरु केली. मात्र, ‘उभ्या जगाचा पोशिंदा’ म्हणून आपण ज्या शेतकऱ्याचे गुणगान गातो. त्या शेतकऱ्याने आज ‘किडनी घ्या, पण बियाणं द्या’, अशी सरकारकडे मागणी केली आहे. नामदेव पतंगे असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे. पतंगे यांची हिंगोली गावामध्ये पावणे चार एककर शेती आहे.
दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला असतानां, अनके युवक शेतीपासून दुरावल्या गेले. कष्टकरू माय-बापाचे हाल पाहून शेती न केलेली बरी, असे त्यांना वाटत असावे. मात्र नामदेवने हिमंत केली आणि शेती करायला सुरवात केली. मात्र, बियाण्यासाठी किडनी विकण्याची परिस्थिती नामदेववर आली. नामदेव म्हणतो, माझ्या डोक्यावर ८४ हजार रुपये कर्ज आहे. तसेच काही खाजगी कर्ज देखील आहे. हे कर्ज परफेड करायचं तरी कसं ?
मुख्यमंत्री कर्जमाफी केल्याचे सांगत असतात. मात्र, या अर्धवट कर्जमाफीचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना झाला नाही. नामदेवने २०१६ मध्ये पेरणीसाठी घेतलेलं ६० हजार रुपये पीक कर्ज आज ८४ हजारांवर जाऊन पोहचलय. त्यांना सरकारची कर्जमाफीचा देखील कोणताच लाभ झाला नाही.