पिंपरी – बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्येतून एका विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.28) दुपारच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली. ऋषिकेश विलास पांचाळ (वय 17, रा. समर्थनगर, नवी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ऋषिकेशने यंदा बारावीची परिक्षा दिली होती. मंगळवारी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या परिक्षेत नापास झाल्याने ऋषिकेशने आत्महत्या केली.