औरंगाबाद- आज संपूर्ण औरंगाबाद शहराला जोरदार पावसाने आणि गारांनी झोडपले आहे. पावसामुळे औरंगाबाद शहरातील नागरिक आणि शेतकरी समाधानी झाले आहे. सायंकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आजच्या मुसळधार पावसामुळे वातावरणामध्ये चांगलाच गारवा पसरला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली होती. मात्र, राज्यात यावर्षी जूनच्या पहिल्या आठ्वड्यातच वरूणराजाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच समाधानी झाले आहेत.
Aurangabad: Rain and hailstorm lashed parts of the city, today. #Maharashtra pic.twitter.com/po45LZbzq5
— ANI (@ANI) June 10, 2019