मुंबई- विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या (सोमवार) 17 जूनपासून सुरु होत आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणवीस हे आज नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान, माध्यमांशी सवांद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘उद्या (रविवारी) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार’ असल्याची माहिती दिली आहे.
Maharashtra CM Devendra Fadnavis in Delhi: Cabinet expansion in Maharashtra will take place tomorrow. pic.twitter.com/neuERxCYGE
— ANI (@ANI) June 15, 2019
मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच शपथविधी सोहळा होणार आहे. राजभवनाच्या ‘दरबार हाॅल’च्या दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे राजभवनाच्या गार्डनवर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.