इंग्लंडचा क्रिकेटपटू मॉन्टी पानेसरचा भारतीयांना सल्ला
नवी दिल्ली – जगात कोणतीही घटना घडली तरी त्याचे गांभीर्य भारतीय नागरिकांना येतच नाही. विरोधाला विरोध, राजकारण, द्वेष यांच्या पलिकडे जाऊन देशाचा तसेच देशवासियांचा विचार करण्याची मानसिकताच बोथट होत असल्याचेही अनेकदा स्पष्ट झाले आहे. घटना कोणतीही असो आपल्याला सल्ले द्यायला परदेशी व्यक्तींची आजूनही गरज का लागते असा प्रश्न पडतो.
करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असतानाही आणि लोकांना आपापल्या घरातच राहण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला तरीही शरीराचा तिसरा मजला रिकामा असल्याचे सिद्ध करत लॉकडाऊनमध्ये देखील विनाकारण बाहेर पडतात. हे सर्व पाहुन इंग्लंडचा माजी कसोटीपटू व गोलंदाज मॉन्टी पानेसर याने भारतीयांना पंतप्रधान मोदींचा सल्ला गांभीर्याने घ्या असे आवाहन केले आहे.
करोनाचा प्रसार जगभरात प्रचंड वाढत आहे. अशा स्थितीत ज्या देशांची लोकसंख्या सर्वाधीक आहे त्या देशांनी तर पूर्ण काळजी घ्यायला पाहिजे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतीय लोक कोणतेही आव्हान गांभीर्याने घेत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. करोनाबाधितांबाबतचे वृत्त पाहिल्यानंतरच खरेतर या धोक्याची व्याप्ती कीती भयानक पातळीवर झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. देशाचे पंतप्रधान जनतेला वारंवार आवाहन करत आहेत आणि कोणीही त्याबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखुन घरातून बाहेर जाणे टाळले तरच करोनाविरुद्धचा लढा जिंकणे शक्य होईल, अन्यथा संपूर्ण मानवजातीला याचा फटका बसेल व त्याचे परिणामही पुढे होत राहतील, असेही त्याने सांगितले आहे.
करोनाचा चीनकडून संपूर्ण जगात झाला. त्याचा फटका इंग्लंडलाही बसला आहे. त्यातून आम्ही सावरण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना तसेच वेळोवेळी केल्या जात असलेल्या आवाहनांना देखील देशातील नागरिक सहकार्य करत आहेत. मग भारतीय नागरिक यापासून कोणताही धडा घेत नाहीत याचेच आश्चर्य वाटते, असेही त्याने स्पष्ट केले.