लंडन – ही विश्वचषक स्पर्धा आहे आणि यात कोणताही संघ कधीही चांगली कामगिरी करू शकतो आणि कोणताही संघ कधीही खराब कामगिरी करू शकतो. आपण या स्पर्धेत काही अनपेक्षित निकाल पहिले आहेत, त्यामुळे आम्ही या स्पर्धेत कोणत्याही संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने आपला पहिला सामना खेळण्यापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
प्रत्येक सामना खेळताना सामन्यासाठी कशा पद्धतीचे वातावरण आहे, खेळपट्टीचा पोत कसा आहे, अशा विविध गोष्टी आम्हाला पाहाव्या लागणार आहेत. इतरांपेक्षा आमच्यासाठी ही गोष्ट समजणे काहीसे अवघड असेल. कारण आमचा पहिला सामना खूपच उशिरा होत आहे. पण तरीदेखील आम्हाला लवकरात लवकर तेथील वातावरण आणि इतर गोष्टींचा अभ्यास करावा लागणार असून त्यानुसार आम्हला आमच्या योजना आखाव्या लागतील, असे विराट म्हणाला.