लंडन – न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यातील दारुण पराभव हा भारतीय संघासाठी ही चिंतेची बाब नसुन भारतीय संघ विश्वचसक स्पर्धेत तितक्याच जोमाने पुनरागमन करेल, असे मत भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे.
तर फलंदाजांची चिंता करण्याचे कारण नाही असे मत जाडेजाने मांडले आहे. जाडेजा म्हणाला की, “हा आमचा पहिला सराव सामना होता. पहिल्या सामन्यातल्या कामगिरीवरुन तुम्ही खेळाडूंच्या कामगिरीचे परिक्षण नाही करु शकत. त्यामुळे माझ्यामते फलंदाजीविषयी चिंता करण्याचे काही कारण नाहीये. भारतामधून इंग्लंडमध्ये आल्यावर पाटा खेळपट्ट्यांवर खेळताना सुरुवातीला कठीण जाते. यामधून सावरत स्वतःचा खेळ सुधारण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. टीम इंडियातला प्रत्येक फलंदाज हा अनुभवी आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जाडेजा बोलत होता.