सातारा – अबाल-वृद्धांपासून मेघांच्या छत्रछायेखाली पंढरीच्या वाटेवरील वारकरी मंडळी माउली-माऊलीच्या जयघोषात अवघड चढणीचा घाट व वाटा झपाझप पावले टाकत पार करत असतात. विठ्ठल दर्शनाच्या आशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. पालखी ओढण्यासाठी मानाच्या बैलजोड्या जुंपल्या होत्या. यंदाचा माउलींचा रथ ओढण्यास बैलजोड सेवा देण्याचा मान आळंदी (ता. खेड) येथील पंडित कृष्णाजी रानवडे यांना मिळला आहे. माऊलींच्या पालखीची मानाची बैल जोडी असलेल्या पंडित राणवडे हे माऊलींच्या पालखीचे कसे सारथ्य करतात? यासंबंधी पालखीच्या रथाचे चालक पंडित रानवडे व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यासोबत यांच्याशी केलेली खास बातचीत…
अशी होतो सर्जा-राजाची निवड
सर्जा-राजा ही बैलजोडी कर्नाटक येथून खरेदी करून आणली आहे. या बैल जोडीचा रंग पांढरा शुभ्र आहे. या जोडीत वजन वाहण्याची उत्तम क्षमता असल्याने या बैलजोडीची विशेष निवड करण्यात आली आहे.