हिंगोली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याला शेतीमधले एवढे कळत नाही मात्र शेतकऱ्यांचे दुःख कळते अशी भावनिक साद देत विरोधकांवर टीका केली.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी उरी, पुलवामा सारखे हल्ले झाल्यावर नुसते निषेध करणारे पंतप्रधान पाहिजेत, का पाकिस्तान मध्ये घुसून पाकिस्तानचे कंबरडं मोडणारे पंतप्रधान पाहिजेत? असा सवाल यावेळी विचारला. तसेच शिवरायांच्या महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दाखवली असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी, यंदा लोकसभेवर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा फडकविण्याचे आवाहन यावेळी केले.