मुंबई – २०१९ लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचा फटका सर्वच राजकीय नेत्यांना बसल्याचे दिसून येत आहे. यातच हातकणंगले लोकसभा मतदारसंंघातून पराभव स्विकारावे लागणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ‘कृष्णकुंज’ या राज यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, राजु शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेट घेतली मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. या भेटीनंतर राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधान आलं आहे. यांच्यात केवळ 15-20 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते आहे. पण भेटीत नेमकी काय चर्चा झाली , हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार श्री. राजू शेट्टी ह्यांनी राजसाहेबांची मुंबईतील कृष्णकुंज ह्या निवासस्थानी भेट घेतली. #शेतकऱ्यांचीमनसे? pic.twitter.com/f6R6q07uqF
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) May 28, 2019
त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या भेटीविषयी ट्वीट केलं आहे की, ‘ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार श्री. राजू शेट्टी ह्यांनी राजसाहेबांची मुंबईतील कृष्णकुंज ह्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र ‘#शेतकऱ्यांचीमनसे’ या हॅशटॅगमुळे यातून मनसे शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी नेत्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असा संदेश देण्याचा मनसेने प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.