छिंदवाडा – मोदींनी जेव्हा नोटाबंदीनंतर जीएसटी लागू केला तेव्हा तो आंबट लिंबावर कारले खायला दिल्यासारख होते, अशी टीका शत्रुघ्न सिन्हा यांनी केली.
शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचारसभेत ते बोलत होते. सिन्हा म्हणाले, कॉंग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते आणि त्यामुळेच मी या पक्षात आलो आहे. कॉंग्रेसने देशासाठी मोठे योगदान दिल्यानेच मी कॉंग्रेसमध्ये आलो आहे. यानंतर पुन्हा कोणत्याही पक्षात जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.