नवी दिल्ली – माजी परराष्ट्र तसेच कॉंग्रेस नेते आणि विख्यात लेखक शशी थरूर हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने प्रकाशझोतात असतात.अशातच काहीदिवसापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी यांच्याविरोधात भाजपा नेते राजीव बब्बर यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी शशी थरूर यांनी आज दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Delhi: Shashi Tharoor appeared before Rouse avenue court in “scorpion sitting on a shivling” remark case. Court grants bail to Tharoor on personal bond of Rs 20,000. Matter will now be heard on July 25 for recording of statement of complainant&BJP leader Rajeev Babbar (file pic) pic.twitter.com/byHZvZU5tO
— ANI (@ANI) June 7, 2019
याबाबत सविस्तर वृत्त असे की,’ बंगळुरू लिट फेस्टमध्ये शशी थरूर सहभागी झाले होते त्यावेळी त्यांना पुस्तकातील काही पाने उपस्थितांना वाचून दाखवली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी हे पिंडीवरचे असे विंचू आहेत की, ज्याला तुम्ही आपल्या हाताने काढू शकत नाही किंवा चपलेने मारूही शकत नाही असे विधान केले होते. यावर भाजपा नेते राजीव बब्बर यांनी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. थरूर यांच्या विधानांमुळे बब्बर यांनी आपल्या भावना दुखावल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. या वादग्रस्त विधानानंतर वाद निर्माण झाला होता. दिल्लीमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्याचवेळी न्यायालयाने शशी थरूर यांना जामीन मंजूर केला. याप्रकरणी आतापुढील सुनावणी 25 जुलै रोजी होणार आहे.