नॉटिंगहॅम, दि. 10- सलामीवीर शिखर धवन याने शैलीदार शतक टोलवित भारताच्या धावसंख्येत महत्वाचा वाटा उचलला. माझ्या द्रुष्टीने हार्दिक पंड्या याने 27 चेंडूमध्ये केलेल्या 48 धावा सामन्यास कलाट्णी देणाऱ्या होत्या असे ज्येष्ठ क्रिकेट्पटू के. श्रीकांत यांनी सांगितले.
श्रीकांत यांनी 1983 मध्ये भारतास विश्वचषक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली होती. त्यांनी सांगितले की, धवन याने अतिशय आश्वासक कामगिरी केली. त्याचे मी कौतुकच करतो. मात्र फलंदाजीस बढती मिळाल्यानंतर पंड्या याने केलेली आक्रमक खेळीस भारतास 350 धावांपलीकडे नेण्यासाठी उपयुक्त ठरली. त्याच्याकडून मला आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.
भारताचा 13 जून रोजी न्यूझीलंडशी सामना होणार आहे. त्याबाबत श्रीकांत यांनी सांगितले की, न्यूझीलंडने या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित्व राखले आहे. त्यांच्यावर मात करणे सोपे नाही. त्यासाठी भारताला सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागेल.