मुंबई – मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याचा घटना वाढल्या असून कल्याण परिसरातील नॅशनल उर्दू स्कूलची भिंत कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, ही भिंत शेजारी असलेल्या झोपड्यांवर कोसळल्यानं दोन महिला आणि एका तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 16 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे.
Maharashtra: 3 dead & 1 injured after wall of National Urdu School collapsed at around 12:30 am today in Kalyan, following heavy rainfall in the area.
— ANI (@ANI) July 2, 2019
दरम्यान मालाड पूर्व परिसरात असलेल्या पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईसह उपनगरांत ठिकठिकाणी पाणी साचले आहे.तत्पूर्वी, चेंबूर भागात भिंत कोसळली होती. या घटनेत २ रिक्षांवर भिंत कोसळली होती.