सातारा (प्रतिनिधी) : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तरीही नातेवाइकांकडे जायचे कारण सांगून पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार्या दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार नितीन घोडके यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली अधिका माहिती अशी की, सध्या करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सातारा जिल्ह्याच्या सीमा बंद करून अत्यावश्यक सेव वगळून इतर कोणालाही प्रवेश करण्यास बंदी आदेश दिले आहेत. तरीही आमोल जयसिंग सकटे, प्रियांका अमोल सकटे (दोघे रा. कसबा,ता.बारामती)हे दोघे त्यांच्याकडील वाहनाने नातेवाईकांना भेटण्याचे कारण पुढे करून पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात आले होते. त्यांना वाढे फाटा परिसरात पोलिसांना थांबवून त्यांच्याकडे परजिल्ह्यातून येण्यासाठीचे अत्यावश्यक कारण व परवानगी याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडे ठोस कारण व परवानगी नसल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.