लखनौ – लोकसभा निवडणुकांचा शेवटचा म्हणजेच सातवा टप्पा येत्या रविवारी 19 मे रोजी पार पडणार असून देशभरातील प्रमुख नेतेमंडळी आपापल्या लोकसभा उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी बसपाप्रमुख मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
BSP Chief Mayawati: PM Modi’s government is losing this election, it appears that even RSS has stopped supporting them. In view of unfulfilled election promises & the public agitation, their swayamsevaks are not being seen putting in the work, it has made Shri Modi nervous. pic.twitter.com/u5EFsCITDD
— ANI UP (@ANINewsUP) May 14, 2019
या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे. पराभव समोर दिसत असल्याने संघानेही भाजपाची साथ सोडली आहे, असा टोला मायावती यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपाला लगावला आहे. वृत्तसंस्थेंच्या वृत्तानुसार आज मायावती यांनी मोदींवर पुन्हा एकदा टीका केली. ”सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे. पराभव समोर दिसत असल्याने संघानेही भाजपाची साथ सोडली आहे, असे मायावतींनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या सरकारच्या काळात गुंडगिरीला आळा घातला जाऊ शाला नाही. मग या पक्षांकडून दहशतवादाला कसे रोखले जाऊ शकेल, असा सवाल समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीला विचारला होता.