नवी दिल्ली – पुलवामा हल्ला आणि त्यानंतर बालाकोटवर झालेली कारवाई यावरून, मी जी प्रतिक्रीया दिली होती त्यावर खुद्द पंतप्रधान मोदींनी दिलेली प्रतिक्रीया पाहून मी अवाक झालो, तसेच भारतीय जनता पक्षाने देखील प्रेस कॉन्फरन्स घेत हल्लाबोल केला. तर काँग्रेसच्याच काही नेत्यांनी फोन करून याबाबत जाब विचारला. पण मी जे काही बोललो ते सत्य असल्याचे इंडियन ओव्हरसिज कॉंग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे.
Sam Pitroda, Indian Overseas Congress Chief: I said the truth, I asked a question and I'm entitled to ask a question. Just because I asked a question, you can't label me that I'm not a nationalist, Who are you to ask me? That's when you need courage. https://t.co/NcFKhOFNk1
— ANI (@ANI) April 20, 2019
यावर पुढे बोलताना सॅम पित्रोदा यांनी, मी सत्य तेच बोललो असल्याचे सांगत मी प्रश्न विचारला आणि मला प्रश्न विचारण्याचा हक्क आहे, असेही ते म्हणाले. मी फक्त प्रश्न विचारला म्हणून, मी राष्ट्रवादी नसल्याचे लेबल तुम्ही माझ्यावर लावू शकत नसल्याचे सॅम पित्रोदा यांनी सांगितले.
दरम्यान, बालाकोट हल्ल्या विषयी सरकारने अधिक पुरावे जगापुढे आणायला हवेत अशी सुचना काही दिवसांपूर्वी सॅम पित्रोदा यांनी सरकारला केली होती. त्यावेळी त्यांनी लोकशाहीत प्रश्न विचारले जाणारच असेही म्हटले होते. या आधीच्या प्रतिक्रीयेत पित्रोदा यांनी सरकारने बालाकोट हल्ल्याविषयी अधिक तपशीलाने माहिती देणे गरजेचे होते. असे म्हटले होते. त्यांच्या या प्रतिक्रीयेला मोदींनी आक्षेप घेत विरोधकांवर टीका केली होती व विरोधकांकडून सैन्याचा अवमान केला जात असल्याचे म्हटले होते.