हरिद्वार- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच माध्यमांच्या प्रकाशझोतात राहणाऱ्या साक्षी महाराज यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ‘ममता बॅनर्जी’ यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराजांनी ममता बॅनर्जी यांना राक्षस हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील असल्याचं म्हंटल आहे. ‘जय श्री राम’ म्हणण्यावरून ममता बॅनर्जी तुरूंगात पाठवायची भाषा करतात. असे, तर राक्षस हिरण्यकश्यपू करायचा असं साक्षी महाराजांनी म्हटलं आहे.
त्यामुळे ममता बॅनर्जीया हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील तर नाही ना? असं प्रश्नचिन्ह साक्षी महाराजांनी उपस्थित केले आहे.
Sakshi Maharaj, BJP MP from Unnao: 'Jai Shri Ram' kehne walon ko jail mein bheja ja raha hai, parinaam ye hogya hai ki 'Jai Shri Ram' kehne se vo (West Bengal CM Mamata Banerjee) khisiyane lagin, sadak pe utarne lagin, aur us ke virodh mein pata nahi kya-kya yojnaein banane lagin https://t.co/HxWV7nRMjO
— ANI (@ANI) June 2, 2019