भोपाळ – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर सगळीकडूनच जोरदार टीका होत होती. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यावर आता माफी मागितली आहे.
यानंतर भारतीय जनता पक्षाकडून देखील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वक्तव्य हे वैयक्तिक असल्याचे म्हणत हात झटकले होते. आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपले वक्तव्य मागे घेत माफी मागितली आहे. हेमंत करकरेंबद्दल केलेले वक्तव्य हे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगत, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माझ्या या वक्तव्यामुळे जर विरोधकांना बळ मिळणार असेल तर मी माझे वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हंटले आहे.
Pragya Singh Thakur, BJP LS candidate from Bhopal, on her statement on Mumbai ATS Chief late Hemant Karkare: I felt that the enemies of the country were being benefited from it, therefore I take back my statement and apologize for it, it was my personal pain. pic.twitter.com/j7pzrKf6G5
— ANI (@ANI) April 19, 2019
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना, त्यांनी (हेमंत करकरे) मला चुकीच्या पद्धतीने फसवले होते. मी त्यांना सांगितले होते कि, तुमच्या पूर्ण वंशाचा सर्वनाश होईल. बरोबर सव्वा महिन्याने सुतक लागते. ज्या दिवशी जेलमध्ये गेले होते त्याच दिवशी सुतक सुरु झाले. आणि बरोबर सव्वा महिन्यांनी दहशतवाद्यांनी त्यांना मारले आणि त्याच दिवशी त्यांचा अंत झाला, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. त्यानंतर आज साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मध्य प्रदेशमधील मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल झाली आहे.