नवी दिल्ली – दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. या क्षेत्रात निर्माण झालेल्या मोठ्या स्पर्धेमुळे कंपन्यांच्या महसुलावर आणि नफ्यावर परिणाम होत आहे. यामुळे या क्षेत्रात होणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीत घट झाली आहे.
केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, 2018-19 या आर्थिक वर्षात या क्षेत्रात झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीत 43 टक्क्यांची घट होऊन ही गुंतवणूक केवळ 2.6 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. त्या अगोदरच्या वर्षात ही गुंतवणूक 6.2 अब्ज डॉलर इतकी झाली होती. मंत्र्यांनी सांगितले की, ही गुंतवणूक का कमी झाली याबाबत स्पष्ट कारण देता येणार नाही. केंद्र सरकारच्या या क्षेत्रास संबंधातील धोरणात कसलाही फरक पडलेला नाही हे क्षेत्र वाढावे, असे सरकारची इच्छा आहे. प्राप्त माहितीनुसार 31 ऑगस्टपर्यंत या कंपन्या वरील कर्जाची रक्कम आठ लाख ओटी रुपयावर गेलेली आहे.