शिवसेनेचा नगरपालिका, जिल्हा प्रशासनाला इशारा
सातारा – सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे येत्या 15 दिवसांत न काढा, अन्यथा नगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात शिवसेना बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला. नुकतेच त्या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांना देण्यात आले.यावेळी शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, दत्ताजी नलावडे, शिवाजी इंगवले, सचिन जगताप, नीलेश मोरे, सागर धोत्रे, सयाजी शिंदे, नितीन लकेरी आदी उपस्थित होते. साताऱ्यातील अतिक्रमणांच्या विषयावर शासकीय बैठकांमध्ये चर्चा होते मात्र, नंतर कोणतीही कारवाई केली जात नाही. अशा परिस्थितीत प्रशासन व पालिका जाणीपुर्वक गांधारीची भूमिका घेताना दिसून येत आहे.
501 पाटी रोड आणि तहसील कार्यालय ते भूविकास बॅंक चौक रस्त्यावरील अतिक्रमणे वाढली आहेत. पदपथावर ऊसाचे गुऱ्हाळ, फळविक्रेते, पाणपट्टी दूकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पदपथ हे खोकीदारांसाठीच निर्माण केले आहेत का, असा प्रश्न आता सातारकरांना पडू लागला आहे. मात्र, वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूकीचे तीन-तेरा वाजले आहेत.
त्यामुळे येत्या 15 दिवसांमध्ये अतिक्रमणे निघाली नाही तर शिवसेना बोंबाबोब आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आला. दरम्यान, सातारा शहराबरोबर जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत देखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून ती अतिक्रमणे दूर करण्यासाठी शिवसेना आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी राजू नाईक, संकेत जगताप, राजू काळे, अनिल भोसले, दिपक बावधने, अमितकुमार जाधव, शिवाजी पवार, सचिन जगताप, शिवाजी इंगवले, सुमित नाईक, योगेश शेलार, संग्राम कांबळे, सचिन शिंदे, हेमंत ऊबाळे, विनायक शिंदे, सुनील भोसले, महेश चवरे आदी उपस्थित होते.