नवी दिल्ली – राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, दुष्काळी उपाययोजनांसाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
The letter also mentions that there are earlier examples when MCC relaxation was given in 2009. CM has requested to allow a cabinet meet&Ministers' visits to drought affected areas for taking stock of situation&necessary works which are to be undertaken as drought relief measures https://t.co/6PFBJeNd0D
— ANI (@ANI) April 30, 2019
दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण १५१ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे आणि केंद्र सरकारने राज्यात दुष्काळग्रस्त भागासाठी आर्थिक मदत म्हणून ४७१४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे राज्यातील दुष्काळाची स्थिती विदारक असल्यामुळे राज्य सरकारला दुष्काळी मदत कार्यात सूट देण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात २००९ मध्ये अशाच प्रकारची अनुमती देण्यात आली होती, याकडे लक्ष वेधत देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या दाहकतेवर लवकरात लवकर उपाययोजना करणे सोपे होईल असे म्हंटले आहे.