नवी दिल्ली – भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असला तरी, रवी शास्त्री यांच्या मते इंग्लंडचा संघ विश्वचषक स्पर्धा जिंकू शकतो.
गेल्या दोन वर्षांत इंग्लंडच्या संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्याकडे अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजीतही ते सरस आहेत. त्यात त्यांच्या घरच्या मैदानांवर स्पर्धा होत आहे. त्यामुळे ते विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत, असे शास्त्री यांनी सांगितले.